चार बांगलादेशींना ताब्यात घेतले   

नवी दिल्ली : दिल्लीतील नरेला परिसरात बेकायदा वास्तव्य करणार्‍या चार बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.मागील काही दिवसांपासून देशात बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेतला जात आहे. बांगलादेशातील खुदीग्राम आणि नाकेश्वरी जिल्ह्यांतील रहिवासी असलेल्या हाफिजुल (वय-१९), मोमिनुल (वय-२१), शमीम (वय-२२) आणि इनामुल (वय-३८) या चार जणांना ताब्यात घेण्यात आले, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. चौघेही कोणतेही वैध कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. चौकशीमध्ये पालकांसोबत बालपणीच आपण भारतात प्रवेश केला, अशी कबुली त्यांनी दिली. त्यांचे कुटुंब नंतर बांगलादेशला परतले; परंतु, ते भारतातच राहिले, असेही ते म्हणाले. ते कामाच्या शोधात बहादूरगढ, सोनीपत, खुर्जा, महेंद्रगढ, गाझियाबाद, बेहरोर आणि दिल्ली यासारख्या शहरांमध्ये फिरत असल्याचे चौकशीत समोर आले. ते कोणत्याही ओळखपत्रांशिवाय रस्त्याच्या कडेला राहत होते. सध्या ते एका डिटेंशन सेंटरमध्ये आहेत आणि त्यांना परत पाठवले जाईल, असे अधिकार्‍याने सांगितले.

Related Articles